Posts

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

शेतीसाठी विहीर अनुदान योजना  Viheer yojna  ह्या योजनेसाठी शासनाकडून  मिळवा 4 लाख रुपये अनुदान  राज्यातील बरेचसे शेतकरी हे पैश्याच्या अभावी आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी व पाण्याची सुविधा करण्यासाठी असमर्थ आहेत ह्या योजनेच्या माध्यमातून जर शेतात विहीर झाली तर  शेतकरी शेतीला पुरेसे पाणी देवू शकतो व आर्थिक दृष्ट्या संपन्न होवू शकतो . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून शासन शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान देत जाणार आहे. भूजलाच्या सर्वेनुसार  राज्यात अजून 4 लाख विहीर खोदणे शक्य आहे. ह्या विहिरी लवकरात लवकर खोदल्यास आपला शेतकरी राजा सुखी व आनंदी,समाधानी होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. शेतकरी वर्गाचे दारिद्र्य घालवण्यासाठी व मागेल त्याला विहीर  ( निकषानुसार ) ह्यासाठी ह्या  योजनेचा  शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. # लाभधारकाची निवड  या याजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्यक्रमाने विहिर मंजुर केली जाईल, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. 1.अनुसूचित जाती 2.अनुसूचित जमाती 3.भटक्या जमाती

मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना 2.0

Image
  शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना 2.0 चा शुभारंभ  Translate to English Hindi Tamil Telugu Gujarati Marathi Bengali Kannada Malayalam Sindhi Assamese Urdu Sanskrit Punjabi Odia Konkani Dongri Bodo Manipuri Nepali Santali Maithili Kashmiri मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना 2.0 ह्या अभियानाचा शुभारंभ अथवा उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होवा हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे . रात्री अपरात्री विजेचे नियोजन नसल्याने आपल्या शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे . जंगली जनावरे त्यात प्रामुख्याने बिबट्याचा हल्ली खूप त्रास वाढला आहे , ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यावर सरकारने असे ठरविले की  सौर ऊर्जेचा जर वापर केला तर शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा करता येईल ह्या उद्देशानेच राज्य सरकारने कृषी सौर वाहिनी योजना स्थापन केली. तसे पाहिले तर मानवाच्या अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा असल्या तरी  याचबरोबर सध्या डिजिटल दुनियेत  उर्जेची गरजही आता वाढली आहे. भारतात तसे  पारंपरिक ऊर्जास्त्रोत मो

अटल पेन्शन योजना - सरकारी पेन्शन योजना

 भारत सरकार अटल पेन्शन योजना  महिन्याला  फक्त 210 रुपये जमा केल्यावर  मिळवा  60,000 रुपये पगार वर्षाला  अटल पेन्शन योजनेत तुम्हाला कमीत कमी  20 वर्षे पैसे जमा करण्याचा  नियम आहे .व्यक्तीने वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला  पेन्शन मिळू शकते  अटल पेन्शन योजना   प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही भारतात कमी कालावधीत प्रसिद्ध झालेली योजना आहे .  ह्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमची आर्थिक बचत  करुन  उतार वयात महिन्याचा औषधांचा खर्च व तुम्हाला लागणारा खर्च भागविता येवू शकतो तुम्हाला कोणावरही अवलंबून रहायची गरज लागणार नाही . तुम्ही ह्या योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर होवू शकता . लवकरात लवकर  या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर योजनेतंर्गत तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. ही योजना सर्व सरकारी   बँक (Bank) अथवा पोस्ट कार्यालयातही (Post Office) उपलब्ध असून तुम्ही ऑफिस मध्ये जावून संपूर्ण माहिती घेवू शकता .. .  भविष्यासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर अटल पेन्शन योजना हा सर्वात उत्तम व चांगला पर्याय ठरू शकतो. अटल पेन्शन योजनेत जर तुम्ही आर्थिक गुंतवणूक केली तर व्यक्तीच्या 60 व्या वर्षा

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

अपंग / दिव्यांग घरकुल योजना - त्याची माहिती  दिव्यांगांचे जीवनमान उंचवण्यासाठी व त्यांना घरकुल मिळावे म्हणून शासनाकडे विविध संगठना मागणी करत असतात त्यामुळे शासनाने अर्थसंकल्प 2023 मध्ये 100 कोटींची तरतूद अपंगांसाठी केली आहे . राज्यात जवळ जवळ 30 लाख अपंग असून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अपंगांसाठी 40 टक्के अपंगत्व असलेल्यांना घरकुल मिळावे अशी मागणी देखील केली ... अपंग घरकुल योजना महाराष्ट्र राज्य  ही योजना राज्य  सरकार ची योजना आहे दिव्यांग योजना  चा उद्देश दिव्यांग मागासवर्गीयांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देणे. कधी सुरु झाली 27 फेब्रुवारी 2019                     पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना कळविण्यात जो कोणी अपंग असेल व त्याच्याकडे 40 टक्के अपंग असलेला ऑनलाईन दाखला असेल तर त्याने ग्रामपंचायत मध्ये जावून आपला घरकुल चा फॉर्म भरून आपली कागदपत्रे तेथे जमा करावी ती कागदपत्रे ग्रामसेवक अथवा सरपंच तत्काळ मंजुरीसाठी पंचायत समितीला पाठवून देतात .दर  वर्षासाठी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत निधीतून यशवंत अपंग घरकुल योजना मंजुरी देण्यात येत असते .ज्या लाभार्थ्यांना पक्के घर न

सुकन्या समृद्धी योजना - बेटी बचाव बेटी पढाओ

सुकन्या समृद्धी योजना व त्याची उद्दिष्टे. मुलींचे भविष्य पाहता सरकारने सुकन्या समृद्धी योजना अमलात आणली ,कारण ह्या 10 वर्षाच्या आतल्या कालखंडात स्त्री भ्रूण हत्यांचे प्रमाण खूप वाढले होते ,मुलगी जन्माला आली की पालकांना ती खूप मोठी जबाबदारी वाटते त्यामुळे समाजात मुलीचे प्रमाण खूप कमी होत चालले होते ह्या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व स्त्रीभ्रूण हत्या होवू नये म्हणून सरकारने सुकन्या समृद्धी योजनेची स्थापना केली....  सुकन्या समृद्धी योजना काय आहे व त्याचे काय फायदे आहेत ह्याची आपण  सविस्तर माहिती पाहणार आहोत. भारत सरकार अश्या अनेक योजना चालवत आहे ज्याद्वारे मुलींचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. त्यामधील अशीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना.  सुकन्या समृद्धि  योजनेची उद्दिष्ट्ये.. भारताचे लाडके पंतप्रधान यांनी सुकन्या समृध्दी योजना ही मुलींचे उज्वल भवितव्य व्हावे यासाठी २२ जानेवारी २०१५ रोजी ह्या योजनेची  स्थापना केली ..  या योजनेंतर्गत पालकांनी आपल्या मुलीचे  बचत खाते  राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात उघडले पाहिजे . ज्या  पालकांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि किंवा लग्न

संजय गांधी निराधार योजना.....

संजय गांधी निराधार अनुदान योजना  क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेसाठी लाभार्थी खालीलप्रमाणे  या योजनेसाठी  60 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला       ( ज्यांना मुल बाळ सांभाळणारे नाही असे ), निराधार महिला  अनाथ मुले  अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), विधवा महिला ज्यांची मुले 18 वर्षा खालील पाहिजे ,घटस्फोट  झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, असे अनेक नियम ह्या योजनेत समाविष्ट आहे.  संजय गांधी निराधार योजनेसाठी  दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत अथवा तलाठी कार्यालयात संपर्क करून माहिती घेवू शकता ,जर तलाठी activ असेल ,सरपंच activ अस

ई श्रम कार्ड योजना - असंघटित कामगार योजना

 ई श्रम कार्ड योजना - असंघटित कामगार योजना सरकार द्वारे ई-श्रम पोर्टल योजना ही कामगारांसाठी 26 ऑगस्ट 2022 रोजी सुरू करण्यात आले आणि याद्वारे सरकार कामगारांना ई-श्रम कार्ड देखील प्रदान करते.त्यासाठी  आवश्यक  कामगारांसाठी असणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे  1   आधार कार्ड  2    प्यान कार्ड  3    आधार लिंक केलेला मोबाइल क्रमांक  4    बँक खाते पुस्तक  इ श्रम कार्ड योजना  कर्मचार्‍यांसाठी ( पेन्शन योजना )भारत सरकारने त्यांच्या वृद्धावस्थेत सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केली आहे...   इ श्रम कार्ड धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास रु. 2 लाख, आणि  अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये भेटणार . ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला 500 रु.शासनाकडून दिले जाणार... ई-श्रम कार्डधारकांना सरकार 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार असून त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे वेगळे प्रीमियम भरण्याची गरज नसणार आहे  या अंतर्गत ई-श्रम कार्ड धारक अपंग झाल्यास. त्याला एक लाख रुपये मिळतात.  ई-श्रम कार्डधारकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यास  त्याला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. हे विमा संरक्षण त्यांना पंतप्रधान सुरक्षा